Monday, May 28, 2018

नेहरूंनी भारताला काय दिले ?

नेहरूंनी भारतासाठी घेतलेले प्रमुख निर्णय ज्यासाठी नेहरू भारतासाठी कायमच वंदनीय राहतील :

१. लोकशाही पद्धत देशासाठी स्वीकारणे - जगातील सर्वात जास्त विविधता असूनही सरकार निवडणारा जगातील सर्वात मोठा  लोकशाही देश.
२. इस्रो ची स्थापना - आज स्वस्तात अवकाशात उपग्रह सोडणारा जगातील एकमेव पर्याय
३. भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना - आज अणुऊर्जा आणि अणुबॉम्ब क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण
४. भारतात सर्वत्र शिक्षणासाठी युनिव्हर्सिटी निर्माण केल्या - आज बौद्धिक क्षेत्रात भारत इतर कोणाही पेक्षा कमी नाही.
५. विविधतेतून एकता ही शिकवण भारताला दिली ज्यामुळे लोकशाही पद्धती टिकवण्यासाठी लोकांनी एकमेकांत मिळून मिसळून राहावे. हा मुद्दा थेट स्पष्ट नाही करता येणार पण खूप मोठी गोष्ट होती त्याकाळी.
इतरही अनेक आहेत. पण तूर्तास इतके पुरे.
६. नेहरूंनी केलेली अजुन एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्यूरोक्रेसी मंत्र्यांच्या नियंत्रणाबाहेर ठेवली. एक स्वायत्त संस्था जी भारतासाठी सर्व धोरणात्मक नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करते. तिला निष्पक्षपणे काम करता यावे यासाठी नेहरूंनी घेतलेला हा खूप महत्त्वाचा निर्णय होता.

आजच्या काळातील उदाहरणे मी वर मुद्दाम दिली आहेत कारण जेव्हा कोणतीही कल्पना नव्हती तेव्हा नेहरूंनी काळाच्या पुढे पाहून या संस्थांची आणि देशाची निर्मिती केली होती. चुकाही झाल्या आहेत. कोण नाही करत ? आजचे पंतप्रधान देखील करत आहेत. त्या काळच्या मानाने नेहरूंनी देशाचा पूर्ण ढांचा खूप छान पद्धतीने निर्माण केला होता. जो आज आपल्याला फलदायी आहे.

जेव्हा भाजप आणि भाजप चे नेते जेव्हा म्हणतात की काँग्रेस ने गेल्या ७० वर्षांत काही केले नाही तेव्हा लोकांनी आपले डोके त्यांच्या फेकाफेकीला अर्पण करू नये यासाठी ही पोस्ट.

No comments:

Post a Comment