Tuesday, November 19, 2019

…म्हणून मोदींचा पराभव मोदीच करतील!

लोकसत्ता मध्ये श्री. मनोज वैद्य यांचा एक लेख एप्रिल २०१९ मध्ये म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी आला होता. त्यात जनमानस मोदींच्या किती विरोधात गेले होते हे एकदम स्पष्टपणे मांडलेले आहे. २०१९ च्या निवडणुका संपल्या आणि भाजप ने २०१४ पेक्षा जास्त जागा निवडणुकीत जिंकल्या आणि एकहाती सत्ता पुन्हा मिळविली. जनमत तीव्र विरोधात असूनही मोदींना हे यश मिळण्याची काहीही शक्यता नव्हतीच. पण EVM मशिन्स मध्ये खूप मोठा घोटाळा करून हवी तशी मते आपल्या बाजूनी भाजपने पाडून पुन्हा सत्ता मिळवली असा आरोप भाजपवर केला जातो. त्यात तथ्य सुद्धा आहे. कारण मतमोजणी करताना अनेक मशिन्स मध्ये भाजपची मते एकूण मतदानाच्या आकडेवारी पेक्षाही जास्त भरली. तर अनेक ठिकाणी कोणतेही बटण दाबल्यावर भाजपला मत मिळत होते. अशा शेकडो तक्रारी येऊनही निवडणूक आयोगाने त्या तक्रारी फारशा महत्त्वाच्या नाहीत असे सांगून दुर्लक्ष केले. 
असो तर हा लेख भाजपा सत्तेवर आल्यानंतर सुद्धा आजही तितकाच लागू होतो आहे. पुढे मागे हा लेख असलेली लिंक delete सुद्धा केली जाऊ शकते म्हणून मूळ लेखाची लिंक आणि मूळ लेख जसाच्या तसा खाली देत आहे. 
मूळ लेखाची लिंक : 
https://www.loksatta.com/blogs-news/narendra-modi-will-be-defeated-by-modi-himself-1881672/lite/

मूळ लेख : 

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्या वाऱ्याला साथ देते. जमिनीवर या टोकापासून एक छान लाट तयार होते. खूपच नेत्रसुखद चित्र असतें. मोदींच्या 2014च्या निवडणुकीच्या सभा आठवून बघा. मोदी बोलायचे आणि सभेतील लोक आरंभ तें अंतापर्यंत गवताप्रमाणे डुलायचे. एका लयीत व्हायचे सगळे. कुठलाही कृत्रिमपणा नव्हता. पण गवतला कुठे माहित असते, आपण कुणाचा तरी चारा आहोत. तसेच सभेतील लोकांचे झाले. मोदी यांनी दिलेली आश्वासने साफ खोटी निघणार आहेत, जनसमूहाच्या मनात सुद्धा आले नाही.

मोदी यांच्या अच्छे दिन याबाबतीत काहीच शंका नव्हती. शेतकरी, युवक तसेच महिला या सर्व वर्गाला, मोदी यांनी स्वप्ने दाखविली होती. मग शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव असेल. बेरोजगार तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार असेल. महिलांना महागाई कमी करण्याचे आश्वासन असेल. धर्मांधता व तुष्टीकरण करण्यासाठी नवे “सबका साथ सबका विकास” असेल. हे सगळे मोदी यांनी लावलेला सापळा होता. भारतीय मतदाराला अडकविण्यासाठी.

भारतीयच नव्हे तर, जगातील सगळ्या विकसनशील देशातील, प्रत्येक राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी असली दिशाभूल व खोटी आश्वासने देतोच. भारतात तर हे सर्रास होते. भारतीयांना याची सवयच आहे. मग मोदी यांचे काय चुकले. लोकसभा निवडणुकीत मोदींना पाशवी बहुमत मिळाले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता चांगले यश मिळाले. लोकांनी मोदींच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. गुलामगिरीची मानसिकता असलेल्या भारतीयांना सुद्धा असा कोणीतरी नेता हवाच असतो. अगदी गल्लीत असलेल्या भाईसुद्धा चालतो.

प्रत्येक गावात-शहरातील दहावीत पहिला आलेला विद्यार्थी, हा पुढे पदवी परीक्षेतसुद्धा टॉपर असतोच असे नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची मोठी चूक इथेच झाली. या खंडप्राय देशाचा कारभार ते गुजरातप्रमाणे करायला गेले. सरकारवर नियंत्रण व एककल्ली कारभार यात नक्कीच फरक असतो हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. मोदी यांचे जर कोणी सगळ्यात जास्त नुकसान केले असेल, तर मोदी यांच्यातील आत्मरत, आत्मकेंद्री, संशयी तसेच त्यांच्यातील हुकूमशाही मानसिकतेने इंग्रजी माध्यमातील पत्रकार आकार पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेचे वर्णन करताना सांगितले आहे कि, मोदी यांना दोनच वर्ग माहित आहेत.एक तर तुम्ही त्यांची गुलामगिरी स्वीकारली पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्यांच्या शत्रूच्या यादीतच जागा घ्यावी लागेल. त्यांच्याकडे मित्र, सहकारी हे वर्गीकरणच उपलब्ध नाही.

देशातील जनतेने मोदींना भरभरून मते दिली. देशात असे चित्र निर्माण झाले. जोपर्यंत मोदी ठरवतील, तोपर्यंत ते पंतप्रधान पदावरती राहतील. कोणीच त्यांना हटवू शकत नाही. काँग्रेस तर पुन्हा कधीच दिसणार नाही असे बहुतांश लोक ठामपणे सांगायचे. पण मोदींच्या आतील आत्मस्तुतीच्या मोदीने उचल खाल्ली होती. पंधरा लाखाचा कोट! ज्यावर मोदी -मोदी लिहिले होते. आणि जमीन अधिग्रहण बिलात दुरुस्ती, ज्यामध्ये गब्बर उद्योगपतीच्या हिताकरिता शेतकऱयांच्या बळी दिला जाणार होता. त्याला नगण्य अशा काँग्रेसने विरोध केला. ज्याला पप्पू म्हणून हिणवले जायचे. त्या राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा उल्लेख सूट – बूट कीं सरकार असा सुरु केला. मोदीं या कोटाच्या आत जे गुरफटले ते आजपर्यंत बाहेर पडू शकले नाही. ते वादग्रस्त बिल तर मागे घेतलेच. पण अपवाद वगळता त्यांनी कोट घातला. त्यांना छानछोक्कीची आवड असूनदेखील, त्यांना मी “फकीर”आहे असे सारखे म्हणावे लागायचे. आजपर्यंत मोदी या काँग्रेसने दिलेल्या सूट-बूटच्या टीकेच्या जबर न्यूनगंडातून बाहेर पडू शकले नाही.

मोदींचे सगळ्यात जास्त खोलवर नुकसान त्यांच्यातील अहंकारी मोदींनी केले. बुद्धिमान व्यक्ती एकवेळ उपाशी राहील पण सुमार व अहंकारी मालकाची चाकरी करत नाही. मोदी यांना आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन सोडून गेले हे एकवेळ आपण समजू शकतो. पण स्वतः मोदी यांनी शोधून आणले होते, ते उर्जित पटेल सुद्धा सोडून गेले. नीती आयोगचे अरविंद पानगढिया, राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियम यांनी पळ काढला, यांचा बळी अहंकारी मोदी यांनी घेतला. पण यांचे सल्ले धाब्यावर बसवून मोदी यांनी नोटबंदी सारखा निर्णय घेतला. किंबहुना यांना अंधारात ठेवून घेतला. याचे दूरगामी परिणाम मोदींना तर भोगावेच लागले. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. लोकांचे रोजगार बुडाले, ऐंशी लक्ष आयकर भरणारे त्या प्रक्रियेतून बाहेर पडले. परंतु मोदी अहंकारी नसते तर असा चुकीचा निर्णय घेतला गेला नसता. मोदींनी नोटबंदीमधून काही तात्पुरते लाभ मिळवले असतील. पण त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कमी आल्या असत्या, पण नोटबंदी केली नसती तरी सत्ता आली असतीच. पण आज मोदींना देशातील सत्ता आणताना कठीण झाले आहे.

सेवा व वस्तू कर म्हणजेच जी एस टी बाबतीतसुद्धा मोदींचा हट्टाग्रही स्वभाव नडला. तज्ज्ञ मूग गिळून गप्प होते. तर जेटलीसारखे चमचे तज्ज्ञ झाले होते. त्यामुळे नोटबंदीचे संकट संपत नाही, तोच किचकट जीएसटीने छोटे दुकानदार व सामान्य माणूस भरडून निघाला. मोदी यांच्याविषयी देशात नकारात्मकता स्वतःच मोदी वाढवीत होते. विरोधक थंडच होते. किंबहुना त्याची ताकतच नव्हती. पण त्यामुळं लोकांचा मनातील असंतोष मोदींच्या लक्षातच आला नाही. कधी-कधी दुर्बल विरोधक असल्याने काहीच आंदोलन आदी काही नाही झाले कीं, सत्ताधारी समजून घेतात. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. मोदींची यात गफलत झाली. हट्टी मोदी यांनी पंतप्रधान मोदी यांचे बरचसे नुकसान करून ठेवले होते. यामुळे गुजरातमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडताना थोडक्यात वाचली. पण गुजरातचा आत्मविश्वास काँग्रेसला भाजपचे बालेकिल्ले मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड हे हस्तगत करताना कामाला आला. अमित शाह यांचे पन्ना प्रमुखसारखे निवडणूक व्यवस्थापन मोडीत निघाले.

आत्ममग्न म्हणजेच नार्सिस्ट मोदी सतत सगळीकडे स्वतःची जाहिरातबाजी करायला भाग पाडत होते. परदेश दौरे, देशातील दौरे. सारखी भाषणे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळीकडे आत्मस्तुती करणारी छबी दिसत होती. आतील हुकूमशहा बाह्यरूपात असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना विरोधात जाणाऱ्या प्रत्येक घटकांची गळचेपी करायला भाग पाडत होता. विरोधी पक्षातील लोकांवर सरकारी यंत्रणाचा म्हणजेच सीबीआय, इडी व आयकर विभाग यांचा खुलेआम दुरुपयोग सुरु झाला होता. पण या खुनशी व बदला घेणाऱ्या मोदीने पंतप्रधान मोदीविरोधात देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणले. उत्तर प्रदेशमधील एकमेकांचे तोंडसुद्धा न बघणारे सपा व बसपा एकत्र आले. त्यांनी गोरखपूर व फुलपुर या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवला. जमिनीवर मोदी यांचा पराभव होऊ शकतो, याचे गणित प्रतिशोधाची वृत्ती असलेल्या मोदीने पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यास भाग पाडले. आज उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा महागठबंधनमुळे भाजप देशातील सत्ता गमावू शकते असे आजचे वातावरण आहे.

आज पंतप्रधान मोदीना आतील हेकेखोर मोदीने अडचणीत आणून ठेवले आहे. प्रचार सभामधून पंतप्रधान मोदींसाठी रोजगार, शेती, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी, स्किल इंडिया, स्टार्ट अप, इ. योजनाबद्दल काहीच बोलण्याची सोय ठेवली नाही. ढोंगीपणा व खोटं बोलणाऱ्या मोदींनी पंतप्रधान मोदी यांना अच्छे दिन व पंधरा लाख रुपये यांची फारच अडचण करून ठेवली आहे. राफेल प्रकरणात अतिसाहसी मोदीने पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करून टाकली आहे. चौकीदार चोर है या मोहिमेला उत्तर देणे, त्यांना कठीण झाले आहे. एकेकाळी सूत्रबद्ध प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप पक्षाला, कधी नामुमकिन मुमकिन है, तर कधी मै भी चौकीदार अशा भंपक घोषणांचा आधार घ्यावा लागत आहे.

राम मंदिरापासूनचा प्रचार लोकांना भावत नाही असे लक्षात आल्यावर, पुलवामाचे शहिद व बालाकोट येथील लष्करी कारवाईच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांना मते मागण्याची लाजिरवाणी परिस्थिती कोणी आणली? स्वतःभोंवती क्रमांक दोन कोणीच नसले पाहिजे. मला कोणी प्रतिस्पर्धी नकोच या संशयी मोदीने भाजपची संघ(?) भावना संपवून टाकली आहे. 2014 मध्ये मोदी यांच्या सभांना तिकीट लावून लोक येत होती. सध्या समाज माध्यमातून जे दिसते आहे ते चित्र फारच दारुण आहे. लोकांना पैसे देऊनसुद्धा मोदींच्या सभेतील खुर्च्या भरत नाहीत. समोर असलेल्या काही रांगा सोडल्या तर मोदींच्या भाषणाला कोणाचा प्रतिसाद नसतो. मोदी एकतर्फीच बोलत/रेकत असतात. रेडिओवरच्या मन कीं बात सारखे. समोर फक्त कोमात असलेले, कोणीतरी धरून आणलेली पुतळे असतात. एक निर्जीव गर्दी, जणू काही म्हणतायत मला जाऊ द्या कीं घरी, समस्या वाट पाहत आहेत माझ्या दारी.

मोदी यांचा राजकीय अध्याय वाराणसीत याच निवडणुकीत एखादवेळेस संपू शकतो. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना प्रतिशोध म्हणजेच बदला घेण्याची प्रवृत्ती असलेले मोदी यांनी, जाणीवपूर्वक त्रास दिला. त्यातून प्रियंका गांधी यांनी जर पंतप्रधान मोदी यांना वाराणसीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर एक इतिहास घडेल. मागील निवडूणुकीत मोदीलाट होती. त्याची आकडेवारी लक्षात घेतली तर, पंतप्रधान मोदी यांना जर सर्व विरोधी पक्षाची संयुक्त उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाराणसी मधून भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण हे मोदी विरोधात निवडणूक लढणार होते. परंतु त्यानीं अचानक माघार घेतली व त्यांनी सपा व बसपशी जुळवून घेत्तले, यापूर्वी तसेच रावण रुग्णालयात होते त्यावेळी प्रियांका गांधी यांनी त्यांची घेतलेली सदीच्छा भेट लक्षात घेतली पाहिजे. ही लढत झाली तर मात्र पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट सुद्धा ठरु शकतो. पण या लढतीसुद्धा मोदीच यांनी ओढवून घेतल्या असेच म्हणावे लागेल.

एकूणच मोदी यांनी आपल्यातील मोदी यांना आवर घातला असता. एक पंतप्रधान म्हणून जर प्रामाणिकपणे कर्तव्य निभावले असते. आणि त्यांना त्यांची वचने पूर्ण करण्यात जरी अपयश आले असते. आणि त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केले असते. मला अजून एक संधी द्या. तर आज देशातील चित्र वेगळे असते. आज जे काही उगवले आहे ते मोदी यांनीच पेरले आहे. त्यांच्यातील उग्र मोदी काही ऐकत नाही हे प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून लक्षात आलेच आहे. म्हणूनच मोदी यांचा पराभव केला तर तो फक्त मोदीच करतील!

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

– मनोज वैद्य

एखादे भव्य विस्तीर्ण पठारावर गवताचे कुरण असते. जेव्हा हवेची झुळूक येते, तसे ते गवतसुद्धा त्या वाऱ्याला साथ देते. जमिनीवर या टोकापासून एक छान लाट तयार होते. खूपच नेत्रसुखद चित्र असतें. मोदींच्या 2014च्या निवडणुकीच्या सभा आठवून बघा. मोदी बोलायचे आणि सभेतील लोक आरंभ तें अंतापर्यंत गवताप्रमाणे डुलायचे. एका लयीत व्हायचे सगळे. कुठलाही कृत्रिमपणा नव्हता. पण गवतला कुठे माहित असते, आपण कुणाचा तरी चारा आहोत. तसेच सभेतील लोकांचे झाले. मोदी यांनी दिलेली आश्वासने साफ खोटी निघणार आहेत, जनसमूहाच्या मनात सुद्धा आले नाही.

मोदी यांच्या अच्छे दिन याबाबतीत काहीच शंका नव्हती. शेतकरी, युवक तसेच महिला या सर्व वर्गाला, मोदी यांनी स्वप्ने दाखविली होती. मग शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव असेल. बेरोजगार तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार असेल. महिलांना महागाई कमी करण्याचे आश्वासन असेल. धर्मांधता व तुष्टीकरण करण्यासाठी नवे “सबका साथ सबका विकास” असेल. हे सगळे मोदी यांनी लावलेला सापळा होता. भारतीय मतदाराला अडकविण्यासाठी.

भारतीयच नव्हे तर, जगातील सगळ्या विकसनशील देशातील, प्रत्येक राजकारणी निवडणूक जिंकण्यासाठी असली दिशाभूल व खोटी आश्वासने देतोच. भारतात तर हे सर्रास होते. भारतीयांना याची सवयच आहे. मग मोदी यांचे काय चुकले. लोकसभा निवडणुकीत मोदींना पाशवी बहुमत मिळाले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा निवडणुकीत अपवाद वगळता चांगले यश मिळाले. लोकांनी मोदींच्या खांद्यावर विश्वासाने मान ठेवली होती. गुलामगिरीची मानसिकता असलेल्या भारतीयांना सुद्धा असा कोणीतरी नेता हवाच असतो. अगदी गल्लीत असलेल्या भाईसुद्धा चालतो.

प्रत्येक गावात-शहरातील दहावीत पहिला आलेला विद्यार्थी, हा पुढे पदवी परीक्षेतसुद्धा टॉपर असतोच असे नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांची मोठी चूक इथेच झाली. या खंडप्राय देशाचा कारभार ते गुजरातप्रमाणे करायला गेले. सरकारवर नियंत्रण व एककल्ली कारभार यात नक्कीच फरक असतो हे त्यांनी लक्षातच घेतले नाही. मोदी यांचे जर कोणी सगळ्यात जास्त नुकसान केले असेल, तर मोदी यांच्यातील आत्मरत, आत्मकेंद्री, संशयी तसेच त्यांच्यातील हुकूमशाही मानसिकतेने इंग्रजी माध्यमातील पत्रकार आकार पटेल यांनी नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेचे वर्णन करताना सांगितले आहे कि, मोदी यांना दोनच वर्ग माहित आहेत.एक तर तुम्ही त्यांची गुलामगिरी स्वीकारली पाहिजे. अन्यथा तुम्हाला त्यांच्या शत्रूच्या यादीतच जागा घ्यावी लागेल. त्यांच्याकडे मित्र, सहकारी हे वर्गीकरणच उपलब्ध नाही.

देशातील जनतेने मोदींना भरभरून मते दिली. देशात असे चित्र निर्माण झाले. जोपर्यंत मोदी ठरवतील, तोपर्यंत ते पंतप्रधान पदावरती राहतील. कोणीच त्यांना हटवू शकत नाही. काँग्रेस तर पुन्हा कधीच दिसणार नाही असे बहुतांश लोक ठामपणे सांगायचे. पण मोदींच्या आतील आत्मस्तुतीच्या मोदीने उचल खाल्ली होती. पंधरा लाखाचा कोट! ज्यावर मोदी -मोदी लिहिले होते. आणि जमीन अधिग्रहण बिलात दुरुस्ती, ज्यामध्ये गब्बर उद्योगपतीच्या हिताकरिता शेतकऱयांच्या बळी दिला जाणार होता. त्याला नगण्य अशा काँग्रेसने विरोध केला. ज्याला पप्पू म्हणून हिणवले जायचे. त्या राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा उल्लेख सूट – बूट कीं सरकार असा सुरु केला. मोदीं या कोटाच्या आत जे गुरफटले ते आजपर्यंत बाहेर पडू शकले नाही. ते वादग्रस्त बिल तर मागे घेतलेच. पण अपवाद वगळता त्यांनी कोट घातला. त्यांना छानछोक्कीची आवड असूनदेखील, त्यांना मी “फकीर”आहे असे सारखे म्हणावे लागायचे. आजपर्यंत मोदी या काँग्रेसने दिलेल्या सूट-बूटच्या टीकेच्या जबर न्यूनगंडातून बाहेर पडू शकले नाही.

मोदींचे सगळ्यात जास्त खोलवर नुकसान त्यांच्यातील अहंकारी मोदींनी केले. बुद्धिमान व्यक्ती एकवेळ उपाशी राहील पण सुमार व अहंकारी मालकाची चाकरी करत नाही. मोदी यांना आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन सोडून गेले हे एकवेळ आपण समजू शकतो. पण स्वतः मोदी यांनी शोधून आणले होते, ते उर्जित पटेल सुद्धा सोडून गेले. नीती आयोगचे अरविंद पानगढिया, राष्ट्रीय आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियम यांनी पळ काढला, यांचा बळी अहंकारी मोदी यांनी घेतला. पण यांचे सल्ले धाब्यावर बसवून मोदी यांनी नोटबंदी सारखा निर्णय घेतला. किंबहुना यांना अंधारात ठेवून घेतला. याचे दूरगामी परिणाम मोदींना तर भोगावेच लागले. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली. लोकांचे रोजगार बुडाले, ऐंशी लक्ष आयकर भरणारे त्या प्रक्रियेतून बाहेर पडले. परंतु मोदी अहंकारी नसते तर असा चुकीचा निर्णय घेतला गेला नसता. मोदींनी नोटबंदीमधून काही तात्पुरते लाभ मिळवले असतील. पण त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली. उत्तर प्रदेशमध्ये काही जागा कमी आल्या असत्या, पण नोटबंदी केली नसती तरी सत्ता आली असतीच. पण आज मोदींना देशातील सत्ता आणताना कठीण झाले आहे.

सेवा व वस्तू कर म्हणजेच जी एस टी बाबतीतसुद्धा मोदींचा हट्टाग्रही स्वभाव नडला. तज्ज्ञ मूग गिळून गप्प होते. तर जेटलीसारखे चमचे तज्ज्ञ झाले होते. त्यामुळे नोटबंदीचे संकट संपत नाही, तोच किचकट जीएसटीने छोटे दुकानदार व सामान्य माणूस भरडून निघाला. मोदी यांच्याविषयी देशात नकारात्मकता स्वतःच मोदी वाढवीत होते. विरोधक थंडच होते. किंबहुना त्याची ताकतच नव्हती. पण त्यामुळं लोकांचा मनातील असंतोष मोदींच्या लक्षातच आला नाही. कधी-कधी दुर्बल विरोधक असल्याने काहीच आंदोलन आदी काही नाही झाले कीं, सत्ताधारी समजून घेतात. आम्ही योग्य दिशेने चाललो आहोत. मोदींची यात गफलत झाली. हट्टी मोदी यांनी पंतप्रधान मोदी यांचे बरचसे नुकसान करून ठेवले होते. यामुळे गुजरातमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडताना थोडक्यात वाचली. पण गुजरातचा आत्मविश्वास काँग्रेसला भाजपचे बालेकिल्ले मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड हे हस्तगत करताना कामाला आला. अमित शाह यांचे पन्ना प्रमुखसारखे निवडणूक व्यवस्थापन मोडीत निघाले.

आत्ममग्न म्हणजेच नार्सिस्ट मोदी सतत सगळीकडे स्वतःची जाहिरातबाजी करायला भाग पाडत होते. परदेश दौरे, देशातील दौरे. सारखी भाषणे, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सगळीकडे आत्मस्तुती करणारी छबी दिसत होती. आतील हुकूमशहा बाह्यरूपात असणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना विरोधात जाणाऱ्या प्रत्येक घटकांची गळचेपी करायला भाग पाडत होता. विरोधी पक्षातील लोकांवर सरकारी यंत्रणाचा म्हणजेच सीबीआय, इडी व आयकर विभाग यांचा खुलेआम दुरुपयोग सुरु झाला होता. पण या खुनशी व बदला घेणाऱ्या मोदीने पंतप्रधान मोदीविरोधात देशातील सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणले. उत्तर प्रदेशमधील एकमेकांचे तोंडसुद्धा न बघणारे सपा व बसपा एकत्र आले. त्यांनी गोरखपूर व फुलपुर या पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवला. जमिनीवर मोदी यांचा पराभव होऊ शकतो, याचे गणित प्रतिशोधाची वृत्ती असलेल्या मोदीने पंतप्रधान मोदी यांचा पराभव करण्यास भाग पाडले. आज उत्तर प्रदेशमध्ये सपा व बसपा महागठबंधनमुळे भाजप देशातील सत्ता गमावू शकते असे आजचे वातावरण आहे.

आज पंतप्रधान मोदीना आतील हेकेखोर मोदीने अडचणीत आणून ठेवले आहे. प्रचार सभामधून पंतप्रधान मोदींसाठी रोजगार, शेती, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी, स्किल इंडिया, स्टार्ट अप, इ. योजनाबद्दल काहीच बोलण्याची सोय ठेवली नाही. ढोंगीपणा व खोटं बोलणाऱ्या मोदींनी पंतप्रधान मोदी यांना अच्छे दिन व पंधरा लाख रुपये यांची फारच अडचण करून ठेवली आहे. राफेल प्रकरणात अतिसाहसी मोदीने पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करून टाकली आहे. चौकीदार चोर है या मोहिमेला उत्तर देणे, त्यांना कठीण झाले आहे. एकेकाळी सूत्रबद्ध प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या भाजप पक्षाला, कधी नामुमकिन मुमकिन है, तर कधी मै भी चौकीदार अशा भंपक घोषणांचा आधार घ्यावा लागत आहे.

राम मंदिरापासूनचा प्रचार लोकांना भावत नाही असे लक्षात आल्यावर, पुलवामाचे शहिद व बालाकोट येथील लष्करी कारवाईच्या नावाखाली पंतप्रधान मोदी यांना मते मागण्याची लाजिरवाणी परिस्थिती कोणी आणली? स्वतःभोंवती क्रमांक दोन कोणीच नसले पाहिजे. मला कोणी प्रतिस्पर्धी नकोच या संशयी मोदीने भाजपची संघ(?) भावना संपवून टाकली आहे. 2014 मध्ये मोदी यांच्या सभांना तिकीट लावून लोक येत होती. सध्या समाज माध्यमातून जे दिसते आहे ते चित्र फारच दारुण आहे. लोकांना पैसे देऊनसुद्धा मोदींच्या सभेतील खुर्च्या भरत नाहीत. समोर असलेल्या काही रांगा सोडल्या तर मोदींच्या भाषणाला कोणाचा प्रतिसाद नसतो. मोदी एकतर्फीच बोलत/रेकत असतात. रेडिओवरच्या मन कीं बात सारखे. समोर फक्त कोमात असलेले, कोणीतरी धरून आणलेली पुतळे असतात. एक निर्जीव गर्दी, जणू काही म्हणतायत मला जाऊ द्या कीं घरी, समस्या वाट पाहत आहेत माझ्या दारी.

मोदी यांचा राजकीय अध्याय वाराणसीत याच निवडणुकीत एखादवेळेस संपू शकतो. प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना प्रतिशोध म्हणजेच बदला घेण्याची प्रवृत्ती असलेले मोदी यांनी, जाणीवपूर्वक त्रास दिला. त्यातून प्रियंका गांधी यांनी जर पंतप्रधान मोदी यांना वाराणसीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर एक इतिहास घडेल. मागील निवडूणुकीत मोदीलाट होती. त्याची आकडेवारी लक्षात घेतली तर, पंतप्रधान मोदी यांना जर सर्व विरोधी पक्षाची संयुक्त उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांना मान्यता देण्याच्या हालचाली सुरु आहेत. वाराणसी मधून भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद रावण हे मोदी विरोधात निवडणूक लढणार होते. परंतु त्यानीं अचानक माघार घेतली व त्यांनी सपा व बसपशी जुळवून घेत्तले, यापूर्वी तसेच रावण रुग्णालयात होते त्यावेळी प्रियांका गांधी यांनी त्यांची घेतलेली सदीच्छा भेट लक्षात घेतली पाहिजे. ही लढत झाली तर मात्र पंतप्रधान मोदींच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट सुद्धा ठरु शकतो. पण या लढतीसुद्धा मोदीच यांनी ओढवून घेतल्या असेच म्हणावे लागेल.

एकूणच मोदी यांनी आपल्यातील मोदी यांना आवर घातला असता. एक पंतप्रधान म्हणून जर प्रामाणिकपणे कर्तव्य निभावले असते. आणि त्यांना त्यांची वचने पूर्ण करण्यात जरी अपयश आले असते. आणि त्यांनी भारतीय जनतेला आवाहन केले असते. मला अजून एक संधी द्या. तर आज देशातील चित्र वेगळे असते. आज जे काही उगवले आहे ते मोदी यांनीच पेरले आहे. त्यांच्यातील उग्र मोदी काही ऐकत नाही हे प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून लक्षात आलेच आहे. म्हणूनच मोदी यांचा पराभव केला तर तो फक्त मोदीच करतील!

(लेखक राजकीय विश्लेषक आहेत)

First Published on: April 24, 2019 4:27 pm 
Copyright © 2019 The Indian Express [P] Ltd. All Rights Reserved

Tuesday, April 9, 2019

२०१९ मधील निवडणुका योग्य पद्धतीने होतील का?

२०१९ मधील निवडणुका योग्य पद्धतीने होतील का?

खरे तर हे शीर्षकच एक प्रकारे वादग्रस्त आहे याची मलाही जाणीव आहे. पण एकूण परिस्थिती पाहता २०१४ पेक्षा २०१९ मध्ये जनतेला असे वाटण्यास काहीतरी कारण नक्कीच आहे. माझी भूमिका एकदम स्पष्ट आहे. मी लहानपणापासून शिवसेना आणि भाजप समर्थक होतो. काँग्रेस पक्षाला कधीही मत दिले नव्हते. २०१४ मध्ये मी आणि माझ्या कुटुंबातील १० जणांनी भाजपला प्रचंड आशेने मतदान केले होते. २०१९ साठी आम्हा सर्व १० जणांची भूमिका एकदम स्पष्ट आहे की मतदानात सहभागी व्हायचे नाही. त्याला अन्य कारणेही आहेत. पण असो.
मुख्य कारण काय आहे तर नरेन्द्र मोदी हे ज्या आवेशात २०१३ / १४ मध्ये बोलत होते त्याच्या उलट त्यांचे पूर्ण वागणे पंतप्रधान झाल्यावर आहे. मी प्रत्येक महिना मोदीं काय काय करत होते हे गेली ५ वर्षे ट्रॅक करत होतो.
मोदी एकामागोमाग एक असे नेहरु आणि  गांधी कुटुंबिय , मनमोहन सिंह , यांच्यावर आक्रमक होऊन आरोप करत होते. टीका करत होते. नेमकी हीच गोष्ट मला खटकू लागली. स्वतःच्या हातात सत्ता आल्यावर मोदी काय करणार? याचा पूर्ण ब्लू प्रिंट ते निवडणूकीच्या काळात झालेल्या प्रचारात मांडत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर शपथविधि झाल्यावर सर्वात पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकर्यांच्या कर्जमाफीची घोषणा सर्वात पहिले काम मी केलेले असेल अशी ते घोषणा करत होते. ( या सर्वांचे पुरावे हवे असतील तर यु ट्युब वर सगळी भाषणे उपलब्ध आहेत. जिज्ञासूंनी ती अवश्य पहावीत)
पहिले २ वर्षे भ्रमात गेल्यावर मग मी मोदी सांगत असलेल्या गोष्टी तपासून पहायचे ठरवले. नेमक्या याच काळात मी स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते मनमोहन सिंह यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे देशी - विदेशी अभ्यासकांचे लेख अभ्यासले आणि ते सरकारी डाटा सोबत तपासुनही पाहिले. मग माझा भ्रम तुटू लागला.
मोदींच्या देशभक्ती अथवा हेतूबद्दल मला शंका नाहिये. पण अशा शेकडो फॅक्ट्स समोर आल्या कि ज्यामुळे मला नेहरुंनी किती विपरित परिस्थितित भारताचा ढांचा घडवला, याचे सखोल दर्शन झाले. नेहरु सुद्धा माणूस होते त्यामुळे ते चुकणार होतेच. पूर्ण राष्ट्र निर्माण करायचे होते त्यांना. ज्या चुकांवर मोदी बोट ठेवत आहेत ते मुद्दे मोदींसाठी आज मोठे आहेत. त्या काळात भारताच्या प्राथमिकता वेगळ्या होत्या याचे भान आरोप कर्त्यांना नव्हते. अत्यंत गरीब असलेला देश, जिथे अन्न , वस्त्र, निवारा, शेती, औषधोपचार, शिक्षण या सर्वोपरि महत्वाच्या गरजा होत्या त्यांच्यावर पूर्ण लक्ष देणे अत्यंत गरजेचे होते हे सर्व लक्षात आले, पुढे अनेक पंतप्रधान झाले. पण सर्वांनी नेहरूंनी दिलेल्या आराखड्यानुसार च काम केले. आज मागे वळून पाहताना ६० वर्षांत एका लोकशाही असलेल्या देशाने गरिबीतून इतकी प्रगती केल्याचे जगाच्या इतिहासात दुसरे उदाहरण नाही.  आपली तुलना आर्थिक सधन युरोप अमेरिकेशी आज करु बघतो आहोत. पण हेही बघितले पाहिजे कि गेल्या ६० वर्षांत एका योग्य नियोजनाद्वारे आपण काम केले ते एवढे सोपे असते तर आज आफ्रिका , इतर आशियाई देश, लॅटीन अमेरिकी राष्ट्रे आज कुठल्या कुठे असती. जगात सर्वत्र आज अराजक आहे. भारत हा केवळ एक अपवाद आहे. जगातील सर्वात विपरित परिस्थिति जर कुठे असेल तर ती भारतात आहे. सर्व धर्मिय लोक इथे राहूनही पंडित नेहरुंनी भारताला "सर्व धर्म सम भाव"  या तत्त्वावर राष्ट्राची उभारणी केली. त्यासाठी असंख्य लोकांनी मेहनत घेतली. असे असतानाही काही चुका होणारच. जो काम करतो तोच चुकतो. म्हणून पंडीत नेहरूंनी देशाचे हित आणि देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या सुखासाठी लोकशाही मार्गाने सर्वांना समान संधी मिळावी असा देशाचा ढांचा उभा केला. आज देश जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत काय एकट्या मोदींनी नेऊन ठेवला ?????? २०१४ साली मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तेव्हा भारताने २ ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा आकडा पार केलेला होता. आज ५ वर्षांनी हा आकडा केवळ २.६० ट्रिलियन डॉलर्स इतकाच आहे. पुढील ८ वर्षांत या वेगाने मोदी कोणत्या तोंडाने १० ट्रिलियन डॉलर्स ची अर्थव्यवस्था बनवणार आहेत? ना कोणती योजना ना कोणती व्यवस्था. नुसत्या घोषणांनी अर्थव्यवस्था मजबूत होत नसते. तर त्यासाठी कुशाग्र बुद्धिमत्तेची गरज असते. ती मनमोहन सिंह यांच्या सारख्या सुशिक्षित पंतप्रधानांकडे होती. अशिक्षित असलेल्या मोदींकडून अशा आर्थिक प्लानिन्ग ची अपेक्षा करता येऊ शकेल ?

अशी असंख्य कारणे देता येतील ज्यामुळे हे सहज सिद्ध होते की मोदी हे भारताच्या इतिहासातले अत्यंत अकार्यक्षम पंतप्रधान आहेत. त्यामुळे मोदींना मत म्हणजे देशाच्या मुळावर आपण स्वतःच कुर्‍हाड मारण्याची चूक करतोय असे होईल. तेव्हा मतदारांनो तुम्हाला हवे त्याला मत द्या. फक्त तो उमेदवार भाजप चा नसेल एवढे बघा. अन्यथा २०२४ मध्ये पुन्हा निवडणूका होणार नाहीतच. पण गेल्या ६०/७० वर्षांत जो काही कायदेशीर मार्गाने  , लोकशाही मूल्ये जपत, आपण सर्वांनी जो भारत देश उभा केलेला आहे. तो कायम स्वरुपी मागासलेपणाकडे वाटचाल करेल. खुद्द गुजरात मध्ये काही महिन्यांपूर्वीच दलित लोकांना शिक्षण नाकारले गेले आहे. असा भारत आपल्याला हवाय का? आपण सर्वांनी ठरवा की तुम्ही तुमच्या मुलांना स्वतंत्र विचार्सरणीचे आयुष्य देऊ इच्छिता की त्यांना वर्चस्ववादी लोकांचे गुलाम बनवू इछिता?

भाजपला मत म्हणजे देशद्रोह्यांना मत अशी कटू असली तरी दुर्दैवी वस्तुस्थिती आहे.  तेव्हा मतदारांनो तुम्हाला हवे त्याला मत द्या. फक्त तो उमेदवार भाजप चा नसेल एवढे बघा.

#२०१९_निवडणुका
-सागर

Tuesday, March 19, 2019

मोदींना विरोध का ? आणि मोदींना का निवडून देऊ नये ?


महाराष्ट्र टाईम्स मध्ये एक बातमी आली आहे.
बातमी : Times Now-VMR survey: हवाई हल्ल्यामुळे भाजपच्या जागांमध्ये वाढ?
बातमीची लिन्कः https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/nda-likely-to-gain-13-seats-after-balakot-air-strike-and-get-283-seats-says-survey/articleshow/68475084.cms 


यावर कोणा DharmnirapekshBharat (धर्मनिरपेक्ष भारत) म्हणून एका माणसाने मोदींना का निवडून देऊ नये याची भली मोठी यादीच दिलेली आहे.तीच इथे ब्लॉग वर साठवून ठेवत आहे. कारण प्रतिक्रिया सरकार विरोधी असल्याने उडवण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



१.  एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले?<br/>१. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक ''मॉब लिंचिंग'' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला.

२. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात ''डोंगर पोखरून उंदीर'' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.

३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो ''चुनावी जुमला'' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या.

४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका ''लो बॅलन्स '' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. ''ना खाऊंगा , ना खाणे दूंगा'' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले.

६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.

७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. हनुमानाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला ''प्लास्टिक सर्जरी'' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले.

८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.

९. ''स्मार्ट सिटी'' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर ''स्मार्ट सिटी'' म्हणून उदयास आलेले नाही.

१० आणि ११ क्रमान्काच्या कमेन्ट्स गायब झालेल्या दिसल्या.

१२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे.

१४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.

१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच एल एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा ''दूध का दूध और पानी का पानी'' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!

१६. पुलवामा मध्ये दहशतवादी हल्ला झालाच कसा? गुप्तहेर संघटना झोपा काढत होत्या काय? प्रधान चपराशी कसली चौकीदारी करीत आहे? हा दहशतवादी हल्ला व्हायला केंद्र सरकारचे फालतू धोरण कारणीभूत आहे. ४० पेक्षा जास्त जवान शाहिद झाले आणि चौकीदार प्रचारात मग्न होता. त्याला जवानांच्या सुख - दुःखाचे अजिबात सोयर - सुतक नव्हते. हा शाहिद जवानांच्या टाळू वरचे लोणी खाण्यात व्यस्त होता. एयर स्ट्राईक करून खोटी सहानभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. आता मतदार जनता मोदी आणि भाजपाला नेस्तनाभूत केल्याखेरीज राहणार नाही.


Saturday, February 16, 2019

ये था वाजपेयी का सबसे मुश्किल फैसला, कंधार में छोड़ने पड़े थे 3 आतंकी

ये था वाजपेयी का सबसे मुश्किल फैसला, कंधार में छोड़ने पड़े थे 3 आतंकी

कंधार विमान अपहरण एक ऐसी घटना थी, जिसने वाजपेयी सरकार को आतंकियों की मांग मानने पर मजबूर कर दिया था और शायद यही अटल बिहारी वाजपेयी के लिए सबसे मुश्किल फैसला था.
परवेज़ सागरनई दिल्ली, 17 August 2018
आतंकियों ने 1999 में भारतीय विमान को अपहरण कर 180 लोगों को बंधक बना लिया था
अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) जब देश के प्रधानमंत्री थे, तो एक घटना ऐसी घटी की पूरी दुनिया की नजर भारत सरकार पर टिकी हुईं थी. वो घटना थी इंडियन एयरलाइंस के विमान आईसी-814 का अपहरण. वो एक ऐसा दौर था, जब सात दिनों की बातचीत और तमाम कोशिशों के बाद भारत सरकार ने अपने यात्रियों से भरे विमान को सकुशल मुक्त कराने के लिए तीन कुख्यात आतंकियों को रिहा कराया था. वो दिन शायद अटल बिहारी वाजपेयी के लिए बहुत मुश्किलभरे दिन थे.
इंडियन एयरलाइंस के विमान आईसी-814 का अपहरण
24 दिसंबर 1999 का दिन था. इंडियन एयरलाइंस की फ्लाईट आईसी-814 ने काठमांडू, नेपाल के त्रिभुवन अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे से दिल्ली के इंदिरा गांधी अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे के लिए उड़ान भरी थी. विमान में कुल मिलाकर 180 यात्री और क्रू मेंबर सवार थे. विमान एयरबस ए300 था. जैसे ही विमान करीब शाम के साढे 5 बजे भारतीय हवाई क्षेत्र में दाखिल हुआ, तभी बंदूकधारी आतंकियों ने विमान का अपहरण कर लिया. और वे विमान को अमृतसर, लाहौर और दुबई होते हुए कंधार, अफगानिस्तान ले गए.
दुबई में छोड़े थे कुछ यात्री
कंधार जाने से पहले जब विमान को संयुक्त अरब अमीरात यानी दुबई में उतारा गया था, तब अपहरणकर्ताओं ने 176 यात्रियों में से 27 को दुबई में छोड़ दिया था. उन यात्रियों में ज्यादातर महिलाएं और बच्चे शामिल थे. वहीं रुपेन कात्याल नामक एक घायल यात्री को भी उतारा गया था. जिसे आतंकियों ने विमान में चाकू मारकर गंभीर रूप से घायल कर दिया था. बाद में रुपेन की मौत गई थी.
तालिबान ने घेर लिया था विमान
उस वक्त अफगानिस्तान में तालिबान की हुकूमत थी. उनके बारे में भारत को कम जानकारी थी. लिहाजा भारतीय अधिकारियों और अपहर्ताओं के बीच बातचीत मुश्किल हो रही थी. तालिबान ने भारत की स्पेशल फोर्स को विमान पर हमला करने से रोकने की पूरी तैयारी कर ली थी. तालिबान के सशस्त्र लड़ाकों ने अपहृत विमान को चारों तरफ से घेर कर सुरक्षित कर रखा था.
तालिबान ने की थी मध्यस्थता
उस समय तालिबान को भारत ने मान्यता नहीं दी थी. और न ही अंतरराष्ट्रीय पटल पर तालिबान का कोई वजूद था. लिहाजा तालिबानी अधिकारियों ने अंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त करने की एक कोशिश के मद्देनजर भारतीय अधिकारियों का सहयोग करने के साथ-साथ अपहरणकर्ताओं और भारत सरकार के बीच मध्यस्थता करने की सहमति दे दी. भारत ने भी इस्लामाबाद में अपने उच्चायोग से एक अधिकारी को कंधार भेजा था.
ये थी भारत सरकार से आतंकियों की मांग
अपहरणकर्ताओं ने शुरू में भारतीय जेलों में बंद 35 उग्रवादियों की रिहाई और 200 मिलियन अमेरिकी डॉलर नगद देने की मांग की थी. इधर, भारत में प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी, गृह मंत्री लाल कृष्ण आड़वाणी और विदेश मंत्री जसवंत सिंह समेत समूची सरकार आतंकियों की मांग पर विचार विमर्श कर रही थी. लेकिन आतंकी इससे कम पर मानने को तैयार नहीं थे. दिन बीतते जा रहे थे. वार्ता जारी थी.
वाजपेयी ने मौलाना असद मदनी से की थी बात
अपहरण को दो दिन बीत चुके थे. पूरे देश की निगाहें प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी की तरफ लगी हुई थी. जाने-माने वरिष्ठ उर्दू पत्रकार अशरफ उस्मानी ने आज तक को बताया कि उस मुश्किल दौर में संकट आतंकियों के साथ प्रभावशाली मध्यस्थता कराने का था. इसी बीच पीएम वाजपेयी को पता चला कि जमीयत उलेमा-ए-पाकिस्तान के सदर मौलाना फजर्लुरहमान की बात तालिबान बहुत मानता है. और मौलाना फजर्लुरहमान से भारत के मशहूर मदनी परिवार के सदस्य मौलाना असद मदनी से अच्छे संबंध हैं. पीएम वाजपेयी ने खुद अपना दूत भेजकर जमीयत उलेमा-ए-हिंद के अध्यक्ष मौलाना असद मदनी से आग्रह किया कि वे मौलाना फजर्लुरहमान को मध्यस्थता करने के लिए कहें. असद मदनी पीएम का बहुत सम्मान करते थे. लिहाजा वे मौलाना फजर्लुरहमान से बात करने के लिए राजी हो गए.
मौलाना फजर्लुरहमान ने मध्यस्थता से किया था इनकार
अशरफ उस्मानी बताते हैं कि मौलाना असद मदनी सहारनपुर के प्रसिद्ध नगर देवबंद में रहते थे. लिहाजा, उसी दिन टेलीफोन विभाग ने एक विशेष फोन लाइन उनके घर पर लगाई. जिसके माध्यम से मौलाना असद मदनी ने पाकिस्तान में फजर्लुरहमान से बात की और उनसे तालिबान से बात करने का आग्रह किया ताकि बंधकों को छुड़ाया जा सके. लेकिन मौलाना फजर्लुरहमान ने तालिबान से किसी भी तरह की बात करने से साफ इनकार कर दिया. इस तरह मौलाना असद मदनी और पीएम वाजपेयी की ये कोशिश नाकाम हो गई थी.
तीन आतंकियों की रिहाई पर बनी बात
तालिबान और भारत सरकार के अधिकारी लगातार अपहरणकर्ताओं के साथ बातचीत कर रहे थे. अब भारत सरकार के साथ-साथ आतंकियों पर भी दबाव बन रहा था. सरकार आतंकियों की कोई मांग नहीं मानना चाहती थी. लेकिन भारतीय यात्रियों की जान खतरे में थी. आतंकी मानने को तैयार नहीं थे. लिहाजा, सात दिन बाद यानी साल के आखरी दिन 31 दिसंबर 1999 को बातचीत रंग लाई. अपहरणकर्ता तीन कैदियों की रिहाई की मांग पर आकर मान गए. वार्ताकार उन्हें इस मांग तक मनाने में कामयाब रहे.
तीन कुख्यात आतंकी किए गए थे रिहा
समझौता होने के बाद उस दौर में अटल बिहारी वाजपेयी सरकार के विदेश मंत्री जसवंत सिंह खुद उन तीन कुख्यात आतंकियों को लेकर कंधार के लिए रवाना हो गए थे. वे कंधार हवाई अड्डे पर पहुंचे और वहां आतंकी मौलाना मसूद अजहर, अहमद ज़रगर और शेख अहमद उमर सईद को रिहा कर दिया गया. तीनों आतंकियों के रिहा होते ही विमान संख्या आईसी-814 में बंधक बनाए गए सभी यात्रियों को रिहा कर दिया गया.
वाजेपयी ने देश को खुद दी थी अच्छी ख़बर
31 दिसम्बर 1999 की रात ही फलाइट 814 के छोड़े गए बंधकों को एक विशेष विमान से भारत वापस लाया गया. इससे पहले भारत में प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी ने नए साल की पूर्व संध्या पर पूरे देश को बताया कि उनकी सरकार अपहरणकर्ताओं की मांगों को काफी हद तक कम किया और फिर यात्रियों को मुक्त कराने में कामयाब रही.
ये थे रिहा किए गए आतंकवादी
मौलाना मसूद अजहर. इसी शातिर आतंकी ने साल 2000 में आतंकी संगठन जैश-ए-मोहम्मद का गठन किया था. जिसका नाम 2001 में भारतीय संसद पर हुए हमले के बाद सुर्खियों में आया था.
अहमद उमर सईद शेख. इस आतंकवादी को 1994 में भारत में पश्चिमी देशों के पर्यटकों का अपहरण करने के मामले में गिरफ्तार किया गया था. इसी आतंकी ने डैनियल पर्ल की हत्या की थी. अमेरिका में 9/11 के हमलों की योजना तैयार करने में भी उसकी महत्वपूर्ण भूमिका थी. बाद में डेनियल पर्ल के अपहरण और हत्या के लिए पाकिस्तानी अधिकारियों ने उसे 2002 में गिरफ्तार कर लिया था.
मुश्ताक अहमद ज़रगर. ये आतंकी रिहाई के बाद से पाकिस्तान के कब्जे वाले कश्मीर में उग्रवादियों को प्रशिक्षण देने में एक सक्रिय हो गया था. भारत विरोधी आतंकियों को तैयार करने में उसकी खासी भूमिका थी.
इन आतंकियों ने किया था विमान का अपहरण
इंडियन एयरलाइंस के विमान आईसी-814 का अपहरण करने वाले आतंकियों की पहचान भारत सरकार ने कर ली थी. हैरानी की बात ये है कि सभी अपहरणकर्ता पाकिस्तानी थे. जिनकी पहचान इस प्रकार थी-
इब्राहिम अतहर, बहावलपुर, पाकिस्तान
शाहिद अख्तर सईद, कराची, पाकिस्तान
सन्नी अहमद काजी, कराची, पाकिस्तान
मिस्त्री जहूर इब्राहिम, कराची, पाकिस्तान
शकीर, सुक्कुर, पाकिस्तान
आजतक

Copyright@ 2019 T.V. Today Network