Tuesday, September 19, 2023

कोरा वर देखील सत्ताधारी पक्षाचे विरोधी प्रतिसाद देणार्या लेखकांना फिल्टर : अनुशासनपर्वाचा निषेध

 

देशाचे नाव 'India' हे बदलून 'भारत' ठेवण्याच्या नवीन निर्णयावर आपले काय मत आहे?

कोरा (quora.com) वर वरील प्रश्नावर मी पुढील प्रतिक्रिया दिली आणि त्याला देखील सत्ताधारी पक्षाचे विरोधी प्रतिसाद देणार्या लेखकांना फिल्टर लावलेले दिसले. या अनुशासनपर्वाचा निषेध. माझी हि कमेंट ब्लॉग वर त्यासाठीच टाकतो आहे. पुढे मागे ती .कोरा (quora.com) वरून उडवली जाणार हे दिसते आहे 

Link: https://mr.quora.com/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-India-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/answers/1477743695827484?__filter__=all&__nsrc__=notif_page&__sncid__=44026212394&__snid3__=58858976997 

इंडिया हे नाव ग्रीक लोक सिकंदराच्या आधीच्या काळापासून वापरत असत. एवढेच काय तर भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात २ वर्षे राहून भारताच्या वास्तव्यावर मॅगेस्थेनिस या ग्रीक वकिलाने ग्रंथ लिहिला त्यालाही त्याचे नाव "इंडिका" हेच ठेवावेसे वाटले. इंग्रजी वापरातले इंडिया हे नाव बदलून भारत करणे हा राजकारण्यांना डोके नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. डोके असलेच तर ते भारताच्या जनतेला निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कसे मुर्खात काढायचे ? यात त्यांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. त्यासाठी देशाच्या प्रतिमेचा बळी द्यायला देखील हे राजकारणी कमी करत नाहीयेत हे विशेष. जगभरचे राजकारणी स्वार्थी राजकारण करतात पण राष्ट्राची ओळख पुसण्याचे काम आजपर्यंत जगात कोणी केलेले नाही.

आणि या अडाणी अशिक्षित राजकारण्यांना देवत्व दिलेल्या शिकलेल्या लोकांनी देखील स्वतःची बुद्धी त्यांच्या पायाशी गहाण ठेवलेली आहे असे एकंदरीत दिसते आहे.

मुळात इंडिया, भारत आणि हिंदुस्थान ही नावे ब्रिटिश काळात प्रचलित होती आणि वापरात देखील होती. आजही तेच वापरात आहे. या मुद्द्याचा सविस्तर वेध घेतोच आहे. पण नाव बदलण्याची गरजच काय आणि त्यामुळे फरक काय पडतो ? हेही या सरकारने स्पष्ट करण्याची तसदी घेतलेली नाहीये हे इथे विशेष सांगू इच्छितो. या बदलावर केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका अधिकृत स्टेटमेंट नाहीये. असे असूनही या नेत्यांचे भक्त आणि हुजरेगिरी करणारे लोकच त्यांची तळी उचलत आहेत. का ? हे त्यांनाही सांगता येणार नाही. संस्कृती चे लेबल लावून प्रश्न सुटत नाही.

इंडिया हे नाव केवळ इंग्रजी भाषेत वापरले जाते. इंडिया या नावाला भारत म्हणून वापरण्याची सक्ती भारतात करता येऊ शकते पण विदेशी लोक इंडिया हेच नाव वापरतील याची खात्री कोण देणार ? विदेशी लोक लेखनस्वातंत्र्याला जास्त किंमत देतात. त्यांच्यावर सक्ती करता येणार नाही. आणि ते भारताचा उल्लेख इंडिया हाच करणार. लाखो पुस्तके आहेत करोडो दस्तावेज आहेत ज्यात इंडिया हेच नाव वापरले गेले आहे. कारण त्याला एक इतिहास आहे.

पर्शियन भाषेत अवेस्तन संस्कृतीत "स" हा शब्द वापरात नव्हता म्हणून ते सप्त-सिंधू भूभागाचा उल्लेख हप्त-हिंदू असा करत. तसेच ग्रीक लोकांना सिंधू - इंडस नदी माहिती होती. त्यामुळे या नदीपलीकडचा प्रदेश तो इंडिया ही विदेशी लोकांना असलेली भारताची ओळख. आणि त्यांच्यासाठी हीच ओळख कायम राहणार आहे.

मग भारतात त्या इंडियाचे तुम्ही भारत करा हिंदुस्थान करा हिंदुराष्ट्र करा मेलूहा करा की आर्यावर्त करा. त्याने फारसा फरक पडणार नाही. फरक पडेल तो इथल्या लोकांना केंद्र सरकारने काहीतरी गौरवास्पद काम केल्याचा भास निर्माण केल्याचा. पण हे केवळ भ्रामक चित्र आहे. या बदलामुळे सर्वसामान्य लोकांना ना नवीन रोजगार मिळणार ना महागाई कमी होणार. उलट महागाई वाढणारच आहे. कारण सर्व सरकारी कागदपत्रे, देशाच्या चलनी नोटा, लाखो कोटी रुपयांचे स्टँम्प पेपर्स , सरकारी स्टॅम्प्स , इत्यादी सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे गव्हर्नमेंट ऑफ भारत करण्याचा जो खर्च आहे तो कित्येक लाख कोटींचा आहे. हा ताण नेहरू गांधींच्या चुकांमुळे तुमच्यावर टाकावा लागतो आहे अशी भाषणबाजी नंतर निवडून आल्यावर केली जाईल आणि मुकाट्याने तुम्हाला पेट्रोल २०० रुपये डिझेल १५० रुपये आणि गॅस २,५०० रुपयांचे झाले तरी तुमचे खिसे रिकामे करावेच लागतील. देशाच्या गौरवाची किंमत म्हणून तुम्हाला हा भर सहन करावा लागेल अशी जाहिरातबाजी होईल आणि जनतेला त्यांच्या खिशावर पडणारे हे दरोडे सहन करावेच लागतील. कारण या अडाणी आणि अशिक्षित नेत्यांना तुम्हीच निवडून दिलेले असेल. बहुमत बरोबरच असते असे नाही. पण भ्रमात बहुसंख्य लोकांना आणणे शक्य असते. आणि त्या भ्रमात जनता या अडाणी अकार्यक्षम नेत्यांना निवडून देऊ शकते. जनतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या नेत्यांनाच निवडून देण्याची पद्धत जोपर्यंत देशात पुन्हा सुरु होणार नाही तोपर्यंत संपूर्ण १४० कोटी जनतेला हा त्रास सहन करावाच लागणार आहे.

नावे बदलली म्हणजे जनतेच्या आयुष्यात चांगला बदल होतो का ? हा खरा मुद्दा आहे. नावे बदलण्याचा गाजावाजा कोण करतो ? ज्या नेत्यांकडे ठोस अशी दाखवता येणारी कामे नसली म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी ढोल ताशांचा गजर (खरे तर गाजर) करावा लागतो. पॅकेज ला रेवडी संस्कृती म्हणून बोंब मारणारे ५६ इंची सीना वाले नेतेच आता प्रत्येक दौर्यात हजारो कोटी लाखो कोटींच्या पॅकेजेस च्या घोषणा करत सुटले आहेत. ही पॅकेजेस त्या शहराला , जिल्ह्याना , राज्यांना मिळाली की नाही याचा हिशोब कोणी मागणारही नाही आणि देणारही नाही. उरतील त्या फक्त घोषणा.

एकूणच इंडिया चे भारत या इंग्रजी भाषेपुरते मर्यादित असलेल्या नामांतराचे कोणतेही नियोजन आणि समर्पक कारण सध्याच्या भाजप सरकारकडे नाहीये हे सत्य नाकारता येणार नाही.

भारताचे नाव "भारत" हे जैन राजा भरत याच्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. याचे ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. जे लोक महाभारत काळात देशाचे नाव नेतात त्यांना हे सांगतो की महाभारताचे मूळ ग्रंथाचे नाव देखील भारत नव्हते तर केवळ "जय" होते. आणि मूळ जय महाकाव्यात भरत राजाचे नाव देखील नाहीये. पुढे सौतीने विस्तार करून त्यात राजा भरत जोडला. पण भारत हे नाव जैन राजा भरत यावरून पडले आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे.

सामान्य जनता एवढी मेलेल्या मनाची झाली आहे का की त्यांना वाढती बेरोजगारी , वाढती गरिबी , वाढती महागाई, वाढते खर्च , वाढते कर्जाचे हफ्ते हे सर्व दिसत नाहीये ? तर दिसते आहे. जनतेच्या मनातला असंतोषाचा हा लाव्हा ज्वालामुखीचा स्फोट होईपर्यंत आत उकळत असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मग क्रान्ती होते. ती क्रांती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्फोटाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असते.

हिंदू मुस्लिम , सवर्ण - मागास , आरक्षणे , अशा लढाया लावून लोकांना त्यातच गुंतवले की अडाणी अशिक्षित नेते चुकीचे मार्ग वापरून निवडून येतात.

मरतो तो सामान्य माणूस.

जोपर्यंत वाढते रोजगार, वाढते उत्पन्न, कमी झालेली गरिबी, जनतेच्या खिशावरचा बोजा कमी करणे असे सकारात्मक राजकारण होत नाही. तोपर्यंत इंडियाचा भारत खऱ्या अर्थाने कधीही होणार नाही. मग कागदी घोडे कोणीही नाचवावे. कागदी घोड्यांनी वाघ मरत नसतो हेच खरे.. एवढेच काय तर भारताचा महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात २ वर्षे राहून भारताच्या वास्तव्यावर मॅगेस्थेनिस या ग्रीक वकिलाने ग्रंथ लिहिला त्यालाही त्याचे नाव "इंडिका" हेच ठेवावेसे वाटले. इंग्रजी वापरातले इंडिया हे नाव बदलून भारत करणे हा राजकारण्यांना डोके नसल्याचा स्पष्ट पुरावा आहे. डोके असलेच तर ते भारताच्या जनतेला निवडणुकांसाठी पुन्हा एकदा कसे मुर्खात काढायचे ? यात त्यांचा हात जगात कोणी धरू शकणार नाही. त्यासाठी देशाच्या प्रतिमेचा बळी द्यायला देखील हे राजकारणी कमी करत नाहीयेत हे विशेष. जगभरचे राजकारणी स्वार्थी राजकारण करतात पण राष्ट्राची ओळख पुसण्याचे काम आजपर्यंत जगात कोणी केलेले नाही.

आणि या अडाणी अशिक्षित राजकारण्यांना देवत्व दिलेल्या शिकलेल्या लोकांनी देखील स्वतःची बुद्धी त्यांच्या पायाशी गहाण ठेवलेली आहे असे एकंदरीत दिसते आहे.

मुळात इंडिया, भारत आणि हिंदुस्थान ही नावे ब्रिटिश काळात प्रचलित होती आणि वापरात देखील होती. आजही तेच वापरात आहे. या मुद्द्याचा सविस्तर वेध घेतोच आहे. पण नाव बदलण्याची गरजच काय आणि त्यामुळे फरक काय पडतो ? हेही या सरकारने स्पष्ट करण्याची तसदी घेतलेली नाहीये हे इथे विशेष सांगू इच्छितो. या बदलावर केंद्र सरकारची कोणतीही अधिकृत भूमिका अधिकृत स्टेटमेंट नाहीये. असे असूनही या नेत्यांचे भक्त आणि हुजरेगिरी करणारे लोकच त्यांची तळी उचलत आहेत. का ? हे त्यांनाही सांगता येणार नाही. संस्कृती चे लेबल लावून प्रश्न सुटत नाही.

इंडिया हे नाव केवळ इंग्रजी भाषेत वापरले जाते. इंडिया या नावाला भारत म्हणून वापरण्याची सक्ती भारतात करता येऊ शकते पण विदेशी लोक इंडिया हेच नाव वापरतील याची खात्री कोण देणार ? विदेशी लोक लेखनस्वातंत्र्याला जास्त किंमत देतात. त्यांच्यावर सक्ती करता येणार नाही. आणि ते भारताचा उल्लेख इंडिया हाच करणार. लाखो पुस्तके आहेत करोडो दस्तावेज आहेत ज्यात इंडिया हेच नाव वापरले गेले आहे. कारण त्याला एक इतिहास आहे.

पर्शियन भाषेत अवेस्तन संस्कृतीत "स" हा शब्द वापरात नव्हता म्हणून ते सप्त-सिंधू भूभागाचा उल्लेख हप्त-हिंदू असा करत. तसेच ग्रीक लोकांना सिंधू - इंडस नदी माहिती होती. त्यामुळे या नदीपलीकडचा प्रदेश तो इंडिया ही विदेशी लोकांना असलेली भारताची ओळख. आणि त्यांच्यासाठी हीच ओळख कायम राहणार आहे.

मग भारतात त्या इंडियाचे तुम्ही भारत करा हिंदुस्थान करा हिंदुराष्ट्र करा मेलूहा करा की आर्यावर्त करा. त्याने फारसा फरक पडणार नाही. फरक पडेल तो इथल्या लोकांना केंद्र सरकारने काहीतरी गौरवास्पद काम केल्याचा भास निर्माण केल्याचा. पण हे केवळ भ्रामक चित्र आहे. या बदलामुळे सर्वसामान्य लोकांना ना नवीन रोजगार मिळणार ना महागाई कमी होणार. उलट महागाई वाढणारच आहे. कारण सर्व सरकारी कागदपत्रे, देशाच्या चलनी नोटा, लाखो कोटी रुपयांचे स्टँम्प पेपर्स , सरकारी स्टॅम्प्स , इत्यादी सगळ्या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चे गव्हर्नमेंट ऑफ भारत करण्याचा जो खर्च आहे तो कित्येक लाख कोटींचा आहे. हा ताण नेहरू गांधींच्या चुकांमुळे तुमच्यावर टाकावा लागतो आहे अशी भाषणबाजी नंतर निवडून आल्यावर केली जाईल आणि मुकाट्याने तुम्हाला पेट्रोल २०० रुपये डिझेल १५० रुपये आणि गॅस २,५०० रुपयांचे झाले तरी तुमचे खिसे रिकामे करावेच लागतील. देशाच्या गौरवाची किंमत म्हणून तुम्हाला हा भर सहन करावा लागेल अशी जाहिरातबाजी होईल आणि जनतेला त्यांच्या खिशावर पडणारे हे दरोडे सहन करावेच लागतील. कारण या अडाणी आणि अशिक्षित नेत्यांना तुम्हीच निवडून दिलेले असेल. बहुमत बरोबरच असते असे नाही. पण भ्रमात बहुसंख्य लोकांना आणणे शक्य असते. आणि त्या भ्रमात जनता या अडाणी अकार्यक्षम नेत्यांना निवडून देऊ शकते. जनतेने त्यांच्यासाठी काम करणाऱ्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या नेत्यांनाच निवडून देण्याची पद्धत जोपर्यंत देशात पुन्हा सुरु होणार नाही तोपर्यंत संपूर्ण १४० कोटी जनतेला हा त्रास सहन करावाच लागणार आहे.

नावे बदलली म्हणजे जनतेच्या आयुष्यात चांगला बदल होतो का ? हा खरा मुद्दा आहे. नावे बदलण्याचा गाजावाजा कोण करतो ? ज्या नेत्यांकडे ठोस अशी दाखवता येणारी कामे नसली म्हणजे लोकांना भ्रमित करण्यासाठी ढोल ताशांचा गजर (खरे तर गाजर) करावा लागतो. पॅकेज ला रेवडी संस्कृती म्हणून बोंब मारणारे ५६ इंची सीना वाले नेतेच आता प्रत्येक दौर्यात हजारो कोटी लाखो कोटींच्या पॅकेजेस च्या घोषणा करत सुटले आहेत. ही पॅकेजेस त्या शहराला , जिल्ह्याना , राज्यांना मिळाली की नाही याचा हिशोब कोणी मागणारही नाही आणि देणारही नाही. उरतील त्या फक्त घोषणा. 

एकूणच इंडिया चे भारत या इंग्रजी भाषेपुरते मर्यादित असलेल्या नामांतराचे कोणतेही नियोजन आणि समर्पक कारण सध्याच्या भाजप सरकारकडे नाहीये हे सत्य नाकारता येणार नाही.

भारताचे नाव "भारत" हे जैन राजा भरत याच्या नावा वरून ठेवण्यात आले आहे. याचे ऐतिहासिक पुरावे देखील उपलब्ध आहेत. जे लोक महाभारत काळात देशाचे नाव नेतात त्यांना हे सांगतो की महाभारताचे मूळ ग्रंथाचे नाव देखील भारत नव्हते तर केवळ "जय" होते. आणि मूळ जय महाकाव्यात भरत राजाचे नाव देखील नाहीये. पुढे सौतीने विस्तार करून त्यात राजा भरत जोडला. पण भारत हे नाव जैन राजा भरत यावरून पडले आहे हे ऐतिहासिकदृष्ट्या सत्य आहे.

सामान्य जनता एवढी मेलेल्या मनाची झाली आहे का की त्यांना वाढती बेरोजगारी , वाढती गरिबी , वाढती महागाई, वाढते खर्च , वाढते कर्जाचे हफ्ते हे सर्व दिसत नाहीये ? तर दिसते आहे. जनतेच्या मनातला असंतोषाचा हा लाव्हा ज्वालामुखीचा स्फोट होईपर्यंत आत उकळत असतो. जेव्हा या ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा मग क्रान्ती होते. ती क्रांती कशी असेल हे कोणीच सांगू शकत नाही. स्फोटाच्या तीव्रतेवर ते अवलंबून असते.

हिंदू मुस्लिम , सवर्ण - मागास , आरक्षणे , अशा लढाया लावून लोकांना त्यातच गुंतवले की अडाणी अशिक्षित नेते चुकीचे मार्ग वापरून निवडून येतात.

मरतो तो सामान्य माणूस.

जोपर्यंत वाढते रोजगार, वाढते उत्पन्न, कमी झालेली गरिबी, जनतेच्या खिशावरचा बोजा कमी करणे असे सकारात्मक राजकारण होत नाही. तोपर्यंत इंडियाचा भारत खऱ्या अर्थाने कधीही होणार नाही. मग कागदी घोडे कोणीही नाचवावे. कागदी घोड्यांनी वाघ मरत नसतो हेच खरे.