Saturday, May 5, 2018

कर्नाटकात काँग्रेस का जिंकणार याची कारणे

कर्नाटकात चर्चा सिद्धरामय्या आणि काँग्रेस यांचीच आहे. त्यात येडियुरप्पा बोलले आहेत की मतदारांना हात पाय बांधून भाजप ला मत देण्यासाठी उचलून आणा. त्यामुळे वातावरण बरेच विरोधात आहे.
सिद्धरामय्या एकूण गेली पाच वर्षे भाजप च्या सगळ्या धुरांधरांना पुरून उरले आहेत. गेल्या ३५ वर्षांत पूर्ण ५ वर्षं कार्यकाल पूर्ण करणारे सिद्धरामय्या पाहिले मुख्यमंत्री झाले आहेत. एकूण बंगलोर आणि कर्नाटक यात त्यांनी विकासाची खूप कामे केली आहेत.
जसे इंदिरा कॅन्टीन (बेल्लारी मध्ये भाजप चे कार्यकर्ते प्रचारानंतर इथेच जेवण करताना दिसले होते ... त्याचा फोटो ही सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. )
कावेरी प्रश्न योग्य रीतीने हाताळणे , त्या बैठकीत येडियुरप्पा मोदींकडे वजन वापरण्याच्या विनंतीला मान न देता मीटिंग सोडून निघून जाणे. शेतकऱ्यांना ८५,००० रुपये कर्जमाफी मिळेल आणि ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था, भाजप च्या कोणालाही डोईजड प्रकरणे काढू न देणे.. पोलीस दलावर वचक,
लिंगायत धर्माला मान्यता देऊन भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराची हवा काढून टाकणं व प्रस्ताव लगोलग मान्यतेसाठी केंद्र सरकार कडे पाठवणे, कर्नाटक च्या ध्वजाला मान्यता देऊन केंद्र सरकार कडे  मान्यतेसाठी पाठवणे, या मुळे भाजपा गोंधळून गेली आहे.  कर्नाटकातील प्रमुख शहरांतील रस्त्यांची कामे पूर्ण करणे, पाण्याचे योग्य नियोजन, अशा अनेक गोष्टी सिद्धरामय्या यांचे पारडे यंदाच्या निवडणुकीत खूपच जड करत आहेत. उलटपक्षी भाजप ने गेल्या पाच वर्षांत आक्रस्ताळेपणा शिवाय काहीही केले नाही. उलट ते आपआपसात भांडत बसले. काँग्रेस मध्ये असा असंतोष लोकांसमोर आला नाही. वेळीच सिद्धरामय्या यांनी त्यावर नियंत्रण मिळवले.
असा सगळा प्रकार आहे.
रेड्डी बंधूंच्या कुटुंबातील ८ जणांना भाजप ने तिकीट दिले आहे. त्यांना वाटतंय की ८ जागा पक्क्या झाल्या. ते आठ निवडून येतीलही. पण त्यामुळे सगळा कर्नाटक भाजप ने असंतुष्ट करून टाकलाय.
राहुल गांधींवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन पंतप्रधानां सहित  भाजपच्या नेत्यांनी केलेली चिखलफेक .
अतिशय उर्मट पणे मतदारांना भाजप चे लोक सामोरे जात आहेत. येडियुरप्पा यांचे मतदारांना हातपाय बांधून भाजप ला मत द्यायला आणा हेही वक्तव्य त्याची साक्ष देते.
एकूण भाजपा फुस्स आणि काँग्रेस मस्त आहे. कर्नाटकात काँग्रेस चे पूर्ण बहुमताचे सरकार येणार हे नक्की.
सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री होणार हेही नक्की !!
निवडणुकीचे अंदाज:
काँग्रेस : १३५-१४०+
भाजप : ३५-४०
जे डी एस : ३०-३५
इतर : १४

**************** updates after Results 
इथे माझी मोजण्यात चूक झाली. हे मी विसरलो होतो की केन्द्र सरकार भाजपचे होते आणि सरकारी यंत्रणा (निवडणुक आयोग) भाजप ला मदत करु शकेल. कर्नाटकात शेकडो बुथ्स वर कोणतेही बटण दाबले तरी भाजपला मत जात होते अशा शेकडो तक्रारी आल्या पण निवडणूक आयोगाने फेर मतदानाची मागणी नाकारली. 
या घोळामुळे भाजप प्रमुख पक्ष झाला पण बहुमत मिळाले नाही. सिद्धरामय्या यांना खुर्ची सोडावी लागणार होतीच. तेव्हा त्यांनी राहुल गांधींना सल्ला देऊन जेडीएस शी लोकसभेच्या निवडणुका समोर ठेवून तडजोड करुन सरकार स्थापनेचा सल्ला दिला. 
आणि अशा रितिने त्यांनी येड्डीयुरप्पा यांच्यावर राजकीय कुरघोडी केली. 

पुढील वेळी अंदाज बांधताना सरकारी यंत्रणा किती फुटू शकते याचाही अंदाज घ्यावा लागेल. 

No comments:

Post a Comment